सोमेश्वर -प्रतिनिधी
वीर धरणातून नीरा नदीला विसर्ग वाढला असून 4650 क्यूसेस ने विसर्ग वाढवण्यात आला आहे .
सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800
क्यसेक्स विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणातुन सोडण्यात येणा-या विसर्गामध्ये वाढ करुन तो 4650 रात्री 8.30 वाजता करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा वीर धरण विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
Post a Comment